शहराचे झाले विद्रुपीकरण गडचिरोली शहरातील गल्ली प्रमुख रस्ते चौक अनाधिकृत फलकांच्या जाड्यात

 

 

गडचिरोली शहरात लागलेल्या अनाधिकृत होल्डिंग्स, बॅनर मुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून याकडे नगरपालिकेचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसून येत आहे

 

गेल्या काही वर्षात अनाधिकृत फलकांचे शहर म्हणून गडचिरोली शहर ओळखला जात आहे. या अनधिकृत फलकांमुळे केवळ शहराचे विद्रूपीकरण झाले असे नाही,

 

तर कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झालेले आहेत, तसेच या फलकामुळे नगरपालिकेचे कर सुद्धा मोठ्या प्रमाणात बुडत आहे

 

सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये फलक उभारण्याची जणू स्पर्धाच लागलेली आहे. परिणामी संपूर्ण शहर गल्ली बोळासह प्रमुख रस्ते व चौक अनधिकृत फलकांच्या जाळ्यात सापडले असल्याचे विदारक चित्र गडचिरोली शहरात दिसून येत आहे

 

त्यामुळे वाहतुकीला अडथळे येण्याबरोबर अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

मात्र या सर्व प्रकाराकडे गडचिरोली नगरपालिकेचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असून अनधिकृत होल्डिंग बॅनर लावणाऱ्या लोकांवर कारवाई करावी अशी मागणी शहरातील जाणकार लोकांनी केली आहे.