गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी //इशांक दहागावकर
एटापल्ली: निवेदनात असे म्हटले आहे की सुरजागड लोहखाणीतील खनिज काढण्याचे काम जोमात सुरू आहे. या प्रकल्पामुळे अनेकांना रोजगार मिळाला असला तरी पहाडी वरील खनिज वाहतूक करण्यासाठी अवजड वाहनांचा उपयोग केला जातो. सुरजागड लोहखनिज मार्गावरील आलदंडीचा पूल कमजोर आहे. जड वाहनांमुळे तो तुटून पडण्याची दाट शक्यता आहे तसे झाल्यास सर्वानाच अडचणीचे होईल. तालुका मुख्यालयापासून आठ किलोमीटर अंतरावर हा आलदंडी पूल स्थित आहे. पावसाळ्यात पुरामुळे हा मार्ग काही काळ बंद असतो. आणि पुरामुळे पुलाची दशा आणखीच वाईट झाली आहे.
सुरजागड वरून खनिजाच्या शेकडो अवजड वाहनांचा एटापल्ली ते सुरजागड असा प्रवास सुरू असतो. अशा स्थितीत आलदंडी पूल तुटून पडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. असे झाल्यास याचा फटका या मार्गावर असलेल्या अनेक गावातील ग्रामस्थांनाही बसणार आहे. संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती करावी, तेवहापर्यंत जड वाहतूक बंद करावे अशी मागणी केली आहे
.या मागणीचे निवेदन ,शिवसेना,कॉंग्रेस, भाकपा,भाजपा यांनी संयुक्त निवेदनाद्वारे दिले या प्रसंगी काँग्रेस चे तालुका अद्यक्ष श्री संजय चरडुके , शिवसेने चे तालुका प्रमुख मनीष दुर्गे ,भाकपा चे तालुका सचिव कॉ.सचिन मोतकुरवार , भाजपा युवा मोर्चा अद्यक्ष श्री संपत्ती पैडाकुलवार युवासेना तालुका अधिकारी श्री अक्षय पुंगाठी ,शिवसेना तालुका संघटक श्री सलीम शेख ,भाकपा विद्यार्थी संघ चे श्री स्वानंद मडावी उपस्थित होते