कारच्या अपघातात 5 जणांचा मृत्यू

 

#khabardarmaharashtr, online news, letest news, social,education, politics, crime, corona, exedent#

कृषी उत्पन्न बाजार समिती समोर सोमवारी दिनांक 25 एप्रिल रोजी दुपारी दोनच्या सुमारास भीषण अपघात झाला, या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू, तर चार जण हे गंभीर जखमी झाले आहेत.
पुण्याहून हुबळीकडे निघालेल्या चारचाकी वाहनाचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती समोर सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर चार जण गंभीर जखमी झाले असून जखमींवर सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. सचिन अण्णासाहेब शितोळे (वय ३५ वर्ष), दिलीप जाधव (वय ३६वर्ष ),सोनाबाई जाधव (वय ५४ वर्ष), लाडू दिलीप जाधव (वय १ वर्ष), गौरी दिलीप जाधव (वय ७ वर्ष), अशी मृतांची नावे आहेत. हे सर्व राहणार हुबळी जिल्हा- धारवाड, कर्नाटक येथील तर वर्षा सचिन शितोळे, रेखा दिलीप जाधव, विशाल जाधव, आणि  राहुल दरेकर असे जखमींची नावे असून जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की पुण्याहून हुबळीकडे भरधाव वेगाने चार चाकी जात होती. सोलापुरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात ओव्हरटेक करण्याच्या नादात चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि उभ्या असलेल्या ट्रकला चारचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिली. यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी आहेत जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.